आज विधानसभा निवडणुकीत वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघातील माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. गेली अनेक वर्षे या मतदारसंघातील अगदीच मूलभूत गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, मतदारसंघाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एकनवा अध्याय लिहावा, या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे, माझ्या विषयी आपल्या मनातील भ्रांती दूर करायसाठी मेहनत करायची आहे. माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती कारण ही लढाई माझ्या एकट्याची किंव्हाराजकीय पक्षाची नव्हती, ती होती आपल्या पैकीच एका माणसाची जो समाजातील प्रत्येक घटकासाठी जाती धर्म पक्षाचे भेद न बाळगता, आपल्या जनतेसाठी, आपल्या मतदारसंघाच्या, राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं. आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही, तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, वाशिम मंगरूळपीर मतदारसंघाच्या विकासासाठी, मी माझ्या पूर्ण क्षमतेने मेहनत करत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही.ज्यांनी मला मतदान नाही केलं त्यांचा ही विश्वास जिंकण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच झटत राहीन.

आपलाच, डॉ. सिद्धार्थ आकारमजी देवळे