*मंगरुळपीर प्रतिनीधी*
पिकांतील तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणी केलेल्या तणनाशक औषधांमुळे पिकेच करपल्याच्या घटना सध्या सर्वत्र घडत आहेत. याचा फटका मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकऱ्याला बसला असून या शेतकºयाने तणनाशक फवारल्यामुळे त्यांच्या एक एकरावरील सोयाबीन पीक करपले आहे. तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकरी बंडु किसन शिंदे या शेतक-याने व्यंकटेश कृषी सेवा केंद्रातून १० जुलै रोजी PARIOT 250 ML, TRAAM 250 ML नामक तणनाशक औषध विकत घेतले होते. ही औषधी त्यांनी
१२ जुलै रोजी आपल्या एका एकरामध्ये योग्य प्रमाण वापरून फवारली. परंतू या औषधीचा विपरीत परीणाम झाल्याने शेतकºयाचे एका एकरातील सोयाबीन पीक करपले आहे. या शेतातील पिकाचे मुळ काळे पडत असून पिकाने माना टाकायला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत शेतकरी बंडु शिंदे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आधिच त्रस्त आहे. त्यात सदरचे औषध फवारल्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याने शेताचे स्थळ निरीक्षण व पंचनामा करण्यात यावा व तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.नुकतेच पेरलेले सोयाबीन, पीक जळाल्याने शेतकºयासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, १४ जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी साकेत लांडे , कृषी प्रवेक्षक बि. एस लठा ग्रामपंचायत सदस्य रामदास कदम, शेतकरी बंडु शिंदे ,गजानन हजारे, वैभव अंभोरे ,महादेव शिंदे , विजय शिंदे, यानी पिकाची पाहणी केली व सविस्तर पंचनामा केला.याबाबत उचित कारवाई करून योग्य न्याय देण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी साकेत लांडे व कृषी प्रवेक्षक बि,एस, लढ्ढा ,समितीने शेतकऱ्यांना दिले आहे. यावेळी किसन शिंदे ,बंडु शिंदे, सुनिता शिंदे, विशाल शिंदे, अभिषेक शिंदे ,सुनिल शिंदे ,अर्पिता शिंदे ,समर्पण शिंदे, यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.

0 Comments